Saturday, June 28, 2025

नवी उमेद

धोका मिळाला वाटचालीत,
जगण्याच्या प्रत्येक तहामध्ये,
मी तडजोड पुन्हा करीत आहे. 
शब्द होते गोड, आजही 
गोडवा मनात माझ्या नव्याने साठवितआहे 


सांभाळत गेलो मन माझं,
फसवणुकीने विस्कटलेले स्वप्नांचया तुकड्यांनी 
माझ्याच डोळ्याचे पाणी टिपत आहे. 
हरवलो नाही आजही मी 
नव्या दमाने स्वप्न रचत आहे. 

सारं काही गमावलं, 
अविश्वासाच्या काळोखात हरवलेला 
आशेचं दीप लावत आहे. 
अंधारामागेच सूर्य उगवतो, आजही मी 
पुन्हा काळोखाला जाळीत आहे. 

मी चालतोय अजूनही,
मुजवलेलया पाऊलवाटा नव्याने शोधत
आजही मीच झिजत आहे. 
नको पाठीवर थाप आता,  आजही मी 
खंजीरांचे घाव मोजीत आहे. 

उमलणाऱ्या फुलांवर, 
अनं दरवळणारया सुगंधावर विश्वास 
 नव्यानं पुन्हा ठेवित आहे. 
नको आता रडगाणे नेहमीच आजही मी
माझंच आयुष्य नव्याने जगणार आहे. 
- आवल्या 



"वो सरहद के प्रहरी हैं"

"वो सरहद के प्रहरी हैं"

वो सरहद के प्रहरी हैं, भारत की शान हैं,
धूप हो या तूफ़ां, हमेशा मैदान में जान हैं।
धरती मां के लाल हैं, सीना तान खड़े,
दुश्मन की हर साजिश को, बनकर दीवार खड़े।

मां, बहन, पत्नी, बच्चे—सबसे किया किनारा,
बस उनका एक ही सपना, भारत मां का बने सहारा।
हर बर्फीली चोटी पर, हर तपते रेगिस्तान में,
तिरंगा लहराए ऊंचा, हर मस्जिद, मंदिर, गुरूदारो में।

जय हिंद का नारा, उनके होंठों की मुस्कान है,
उनकी हर सांस में , देशभक्ति की पहचान है।
सलाम है उन वीरों को , जिनसे जीवन हमारा रोशन है,
वो हैं ढाल हमारी , वो हमारी धड़कन हैं। 

वो सरहद के प्रहरी हैं, भारत की शान हैं,
धूप हो या तूफ़ां, हमेशा मैदान में जान हैं।
- आवल्या 

Saturday, April 19, 2025

गजल माझी

गजल
मनात प्रेम फुललं, स्वप्नात रंग रंगलं,
वास्तवात जातीनं, हृदय माझं तुटलं.

तुझ्या नजरेत डूबलो, विश्व सगळं विसरलो,
पण समाजाच्या भेदानं, मी स्वतःलाच हरलो.

कधी हास्य, कधी आठवण, कधी रात्रीचा एकांत,
पश्चात्ताप साथीला, देतो मला हा त्रास खंत.

तुझं नाव ओठांवर, तरी मनात आहे अंतर,
जात वास्तवात हरलं, प्रेम राहिलं अपूर्ण कंतर.

कधी भेटशील का पुन्हा, त्या प्रेमाला जागवून?
की पश्चात्तापच राहील, माझं आयुष्य झुरवून?  
-----आवल्या 
निसर्ग, प्रेम आणि यातनामय वास्तव
हिरवीगार पर्णसंनाद, नदीचा मधुर स्वर,
निसर्गाच्या कुशीत, प्रेम बहरतं थरथर.
पाखरांचं किलबिलणं, फुलांचा सुगंध नाजूक,
तुझ्या नजरेत हरवतं, माझं हृदय सादूक.

प्रेम तुझं सूर्यापरी, उबदार आणि तेजाळ,
पण जात-पातीत अडकलेलं, वास्तव क्रूर काळ.
समाजाच्या बंधनांनी, हृदयाला ठोकळे बांधले,
प्रेमाच्या पंखांना, कातरांनी कापले.

निसर्ग साक्षी, पाहतो तुझ्या-माझ्या मिलनाला,
पण माणूस का बांधतो, जातीचा कठोर जंजाळा?
यातनामय प्रेम माझं, रक्ताळले तरीही जिवंत,
तुझ्या एका स्मितासाठी, मी लढतो अंत.

नदी वाहते, झाडं नाचतात, प्रेम आहे अजरामर,
जात वास्तवाचं विष प्यावं, तरीही प्रेम अमर.
निसर्गाच्या मांडीवर, मी तुझीच वाट पाहतो,
यातनांच्या आगीतून, प्रेमाचा दीप लावतो.
-----
आवल्या 

Friday, March 7, 2025

वेडा

कधी कधी वाटत 
वेडा माणूस म्हणून जगन सोप असत. 
उरत नाही भान मग
बेगडी जगाच.. बेगडी माणसाच
आणि त्याच्या बेगडी माणुसकीच... 
उरत नाही पाश मग 
 बेगडी जातीच..बेगडी  धर्माच
आणि त्याच्या स्वैर संस्काराच.. 
कधी कधी वाटत 
वेडा माणूस म्हणून जगन सोप असत.. 
नसतो आपण कुणाचे.. 
जगतो आठवणीत जुन्या
मारलेला दगड कुरवाळत उराशी.. 
भळभळ  जखमेची.. नव्याने
बांधतो आशेच्या चिंदयानी... 
कधी कधी वाटत 
वेडा माणूस म्हणून जगन सोपे असत

---आवलया



ती


मला वाटल होत तू बदलली असशील ......

आज हि तू तशीच आहेस .का.....
मला वाटल बदलली असशील 
नवीन जगाच्या स्वप्नांच्या रेट्यात ..
आणि थकलेल्या हप्त्यांच्या विंवचनेत ...
हो...वाढलेल्या महागाईच्या ...चर्चेत ...
खरच सांगतो ....
आजही तू तशीच आहेस ...
मला वाटल होत बदलली असशील 
जातीपातीच्या शंखनादाने ...
ओरबडून टाकलेल्या हुंकार्याने 
आणि निशब्द होणाऱ्या वाटमारीने..
पण आजही हि तू तशीच आहेस...
कसा नाही शिवला तुला जातीचा गंध ..
आणि धर्माचा रंग....
खरच आजही तुझ्या ....
खादि शबनम मध्ये ..
लेनिन, मार्क्स आणि आंबेडकर 
 गांधीजी सुध्दा आजही असतात का.....
कस लढायचं आणी कुणा बरोबर 
लढायचं हे तुला आजही सांगतात का.....
खरच सांगतो..
मला वाटल होत तू बदलली असशील ......

--------------------------------------------------------आवल्या 


नवी उमेद

धोका मिळाला वाटचालीत, जगण्याच्या प्रत्येक तहामध्ये, मी तडजोड पुन्हा करीत आहे.  शब्द होते गोड, आजही  गोडवा मनात माझ्या नव्याने साठवितआहे  सां...